Advertisement

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 07/11/2021
बातमी शेअर करा

नेकनूर-नापिकीला कंटाळून येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.७) सकाळी समोर आली आहे.बीड जिल्ह्यात अतवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यात राज्य सरकारकडून मिळालेली मदत अपुरी असल्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे चित्र आहे.  
     नेकनूर येथील सोनाजी काशिनाथ मुळे (वय-६० रा.मुळे गल्ली नेकनूर) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.रविवारी सकाळी सहाच्या वेळेस सर्वज्ञ पेट्रोल पंपाच्या पाठीमागच्या मोरवंडी शिवारात बाभळीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी पोलीस श्री.खांडेकर,श्री.पवार,श्री.राऊत यांनी धाव घेतली आहे. दरम्यान सोनाजी मुळे यांच्या पश्चात दोन मुलं,१ मुलगी असा परिवार आहे.मृतदेहाचे शवविच्छेदन नेकनूरच्या रुग्णालयात करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement