Advertisement

 नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 14/10/2021
बातमी शेअर करा

 बीड दि. १४- मांजरसुंबा (ससेवाडी) येथे अतीवृष्टीमुळे शेतमालाची झालेली नुकसान व दोन वर्षापासून कोरोणाच्या संकटाने  शेतकरी पुर्ण हतबल झाला आहे पिकाच्या जोरावर उसनवारी करून पिके पिकवली  होती, मात्र  अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेले पीक पाण्यात

 

 

गेल्यामुळे ससेवाडी येथील बाबासाहेब लक्ष्मण उंदरे या युवकाने (दि.१३ रोजी ) हतबल होऊन गळफास घेऊन आत्महत्या केली .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या वेळी नेकनुर स्टेशन चे. पो. कर्मचारी पवार साहेब, खांडेकर,राठोड,राऊत, होम. शेख मजर घटनस्थळी उपस्थित होते,

Advertisement

Advertisement