Advertisement

करुणा शर्मा प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

प्रजापत्र | Tuesday, 07/09/2021
बातमी शेअर करा

 

 मुंबई : करुणा  शर्मांना परळीत झालेली  एकंदरच घटनाक्रमावर राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले असून  प्रकरणावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी ट्विट केले असून या संपूर्ण प्रकरणामुळे परळी सुन्न असून राज्याची मान  खाली गेल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे.

 

 

करुणा शर्मांच्या अटकेला दोन दिवस झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडत ट्विट केले असून यात 'अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, 
 नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात बंधू शकत नाही हा विश्वास हरवू नये, रॉंग प्रेसिसिडेन्ट शुड नॉट बी सेट! हि काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची ! ' असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे .
विशेष म्हणजे साऱ्या घटनाक्रमाच्या दोन दिवसानंतर पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे, तर करुणा शर्मा यांनी परळीला येण्यापूर्वीच '२०२४ के इलेक्शनमे मै पंकजाताई का प्रचार करुंगी ' असे म्हटले होते . त्यामुळेही या प्रकरणावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याची सर्वांना उत्सुकता होती. 

 

 

Advertisement

Advertisement