Advertisement

... तर जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

प्रजापत्र | Wednesday, 02/06/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने १ जून पासून लॉकडाऊन मधील अनेक कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, जिल्ह्यातील नागरिक पुन्हा बेफिकिरीने वागत असून नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.

 

जिल्हाधिकारी म्हणाले की,  लॉकडाऊन शिथील केल्यानंतर विनाकारण लोक रस्त्यावर व शासकीय कार्यालयात दिसून येतात ही गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत कोविड रुग्णसंख्या जरी कमी असली तरी गर्दी केल्यास अथवा कोव्हीडचे अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास पुन्हा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते किंवा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल. बेशिस्त नागरीकांच्या वागणुकीचा परिणाम सर्व समाजास त्रासदायक होऊ शकतो. सर्व लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे व कोव्हीडचे नियम पाळुन दिनांक १५ जून पर्यंत शासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement