Advertisement

स्मशानभूमीसाठी थेटेगव्हाण ग्रामस्थांचा संताप

प्रजापत्र | Monday, 07/04/2025
बातमी शेअर करा

धारूर दि.७(प्रतिनिधी) : तालुक्यातील (Dharur) थेटेगव्हाण येथील भिल्ल समाजाच्या नागरिकांनी आज सोमवार (दि. ७) रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह ठेवून ठिय्या मांडला. गावाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीसाठी(Beed) संतप्त ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयांसमोर उपोषण करून ही प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांचा रोष अनावर झाला.

         धारूर तालुक्यातील थेटेगव्हाण येथील भिल्ल समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने (Dharur) अनेक अडचणी येत आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर निवेदन दिले आणि उपोषणे केली. मात्र, (Beed)प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज सोमवार (दि. ७) रोजी सकाळी ११ वाजता एका मृत व्यक्तीचे पार्थिव घेऊन नागरिक थेट तहसील कार्यालयात धडकले आणि प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आपल्या न्याय हक्कासाठी आणि स्मशानभूमीच्या जागेसाठी नागरिकांनी मृतदेह तहसील कार्यालयाच्या दारात ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमले असून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

 
 

Advertisement

Advertisement