Advertisement

वाण नदीच्या पुलावरून कार-रिक्षा वाहून गेले

प्रजापत्र | Thursday, 28/08/2025
बातमी शेअर करा

 धारूर दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यात (Dharur) बुधवारी (दि.२७) रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चारचाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान, यातील एकाच मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे.

        गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार (Rain) पाऊस सुरू आहे. तांदळवाडी धरण भरून वाहत असून त्यामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्री रुईधारुरहून अंजनडोहकडे (Dharur) जाताना रात्री आठ वाजता आडत व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे (वय ४२) यांची कार पुलावरून वाहून गेली. प्रशासन, पोलीस व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर गुरुवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला.

 

आवरगाव येथे तरुण बेपत्ता
दरम्यान, आवरगाव पुलावरूनही रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात अनिल बाबूराव लोखंडे ( २६ ) हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे.

Advertisement

Advertisement