Advertisement

ट्रकने रिक्षाला उडविले,बळींचा आकडा मोठा

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

बीड-येथून जवळ असलेल्या पांगर बावडी नजीक एका भरधाव ट्रकने एका रिक्षाला उडविल्याची घटना सायंकाळी ७ च्या सुमारास घडली आहे. या अपघातात ५ जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. याच ट्रकने पुढे घोडका राजूरी जवळ देखील मोटारसायकल स्वारांना उडविले असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचल्या असून मृतांचा निश्चित आकडा अद्याप समजलेला नाही . या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

Advertisement

Advertisement