Advertisement

लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका

प्रजापत्र | Thursday, 06/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई-   महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. (ladki-bahin-yojana)पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

 

पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला दहा रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

Advertisement

Advertisement