Advertisement

ज्ञानराधाच्या ठेवीदाराने खासदारांपुढे वाचला तक्रारीचा पाढा

प्रजापत्र | Saturday, 27/07/2024
बातमी शेअर करा

नेकनूर दि.२७ (वार्ताहार) -सर्वसामान्य नागरिकांनी कष्ट करून मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी पै पै गोळा करून ज्ञानराधा बँकेत आपल्या ठेवी ठेवल्या होत्या , अनेक व्यापारी यांनी आपल्या धंद्यातील पैसे मागे पडावे यासाठी दररोज पिग्मी भरुन बँकेत जमा केले होते परंतु बँकेतील व्यवहार डगमगल्याने ज्ञानराधा बँक बंद झाली त्यामुळे नागरिकांच्या पैशाचं काय याच गोष्टीने हातबल होऊन अनेक खातेदार धावपळ करत आहेत, आपले बँकेत ठेवलेले पैसे मिळण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे, आज खासदार बजरंग सोनवणे यांच्यापुढे आपले पैसे लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली या वेळी ज्ञानराधाच्या ठेवीदारांनी निवेदन दिले.

Advertisement

Advertisement