कात्रज : आमचं घड्याळ चोरीला गेलं आहे, त्यामुळे तुतारीला मतदान करा आणि आमचे सरकार आणा त्यानंतरच पुण्याचे ट्रॅफिक, खड्डे, पाणी यासारख्या समस्या सुटतील आणि शहराची कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कात्रज येथे सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
बातमी शेअर करा