Advertisement

गेवराईत धनगर समाज आक्रमक

प्रजापत्र | Monday, 25/09/2023
बातमी शेअर करा

गेवराई - धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गात समावेश करा, ही मागणी घेऊन धनगर समाज आक्रमक झाला आहे. गेवराई तालुक्यातील खांडवी येथे कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग आडवत रस्ता रोको करण्यात आला. तब्बल दोन तास रस्ता रोको केल्याने, प्रचंड वाहन कोंडी झाली होती. यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, 2014 पूर्वी बारामती येथील आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सरकार आल्यावर आपण धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू, असा शब्द दिला होता. मात्र तो मार्गी लावला गेला नाही. त्यामुळं आज आमच्या समाज बांधवांना 18 दिवसांपासून चौंडी येथे उपोषण करण्याची वेळ आलीय. त्यामुळं धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा धनगर समाजाच्या वतीने दिला आहे. 

Advertisement

Advertisement