Advertisement

सर्पदंशाने निपाणीच्या शेतकर्‍याचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 19/11/2022
बातमी शेअर करा

गेवराई-शेतीला पाणी देत असताना दोन दिवसापूर्वी निपाणी जवळका येथील शेतकर्‍याला साप चावला होता. त्याला उपचारार्थ औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि.१९) सकाळी सदरील शेतकर्‍याचा दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेने निपाणी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
          सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. रात्री अपरात्री शेतकर्‍यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागते. निपाणी जवळका येथील रामेश्‍वर भागवतराव लोणकर हे परवा रात्री पिकाला पाणी देत असताना त्यांना साप चावला. उपचारार्थ बीड येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते.शनिवारी (दि.१९) सकाळी या शेतकर्‍याचा दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेने निपाणी जवळका येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement

Advertisement