Advertisement

महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 08/11/2022
बातमी शेअर करा

गेवराई दि.८ (प्रतिनिधी)-तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथील एका नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (दि.७) रात्री १० च्या सुमारास घडली.मयताच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

 

          तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथील पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय-२२) यांचा विवाह पौळाचीवाडी येथील एका मुली सोबत झाला होता. लग्नाला २१ दिवस झाले होते.सोमवारी (दि.७) दोघे नवरा-बायको नेहमी प्रमाणे झोपण्यास गेले असता रात्री १० च्या सुमारास पांडुरंग चव्हाण यांची पत्नी खोली बाहेर ओरडत आली. व घरच्यांना त्यांचे अंग थंड पडले आहे. असे सांगितले व गावातील मंडळी घरातील आरडाओरडा पाहुण घरा जवळ आले व ताबडतोब पांडुरंग चव्हाण यांना पुढील उपचारासाठी गेवराई शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.परंतु पांडुरंग चव्हाण यांचा जागीच मृत्यु झाल्याने त्यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता शवविच्छेदन दरम्यान त्यांच्या गळाला खुणा आढळून आल्या. त्यामुळे हा घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांकडून वर्तवली जात आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 

Advertisement

Advertisement