Advertisement

नदीच्या पाण्यात दोघे गेले वाहून

प्रजापत्र | Monday, 27/09/2021
बातमी शेअर करा

केज दि. 27 - मागच्या कांही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे.अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आणखी एका दुर्दैवी घटनेची भर पडली असून धारूर चिंचपूर नदी मध्ये दोघे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
          उंदरी येथील दोघेजण पुलावरून वाहून गेले असून एकाचा मृतदेह सापडला आहे तर एकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे.धारूर पोलीस व प्रशासनाचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असून महादेव सोनवणे व उत्तम सोनवणे रा. उंदरी ता. केज अशी वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Advertisement

Advertisement