नागपूरः विदर्भासह संपूर्ण राज्यात सध्या उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही वाढती दाहकता आणि उष्णतेची लाट अशीच कायम राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार शासन करत आहे, अशी महत्त्वाची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपुरात दिली. १५ जूननंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा

