Advertisement

शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे कोसळला?

प्रजापत्र | Thursday, 26/09/2024
बातमी शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील ३५ फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. यावरुन राजकारण पेटलं होते.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. समितीने १६ पानी अहवाल सादर केला आहे. अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.राजकोट येथील महाराजांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंग कामामुळे कोसळला. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharajas Statue Collapsed)कोसळला, असा अहवाल मालवण दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीने सरकारला दिला आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या पुतळ्याचे अनावरण झाले होते. ३५ फूट उंच असलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता.राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या दुर्घटनेबाबत शिंदे सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने हा अहवाल दिला आहे.

 

 

पुतळा कोसळला यामागे नक्की कारणं काय आहे? याची चौकशी समितीने केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही समिती गठीत करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांचा देखील या समितीमध्ये समावेश होता. आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांचा समावेश देखील या समितीत होता.या ठिकाणी आता शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेत ही समिती काम करीत आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार हे समितीत विशेष निमंत्रित सदस्य आहेत.

Advertisement

Advertisement