Advertisement

बस- टेम्पोचा भीषण अपघात

प्रजापत्र | Friday, 20/09/2024
बातमी शेअर करा

जालना-  जालना - वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघातात झाला. यामध्ये ५ ते ६ जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती गोंदी पोलीसांनी दिली.

 

गेवराईहून जालन्याकडे जाणारी गेवराई आगार बस ( क्रमांक एम एच २० बी एल ३५७३) आणि अंबडहून संत्रा घेऊन येणारा आयशर टेम्पो (क्रमांक एम एच ०१सी आर ८०९९) चा वडीगोद्री जालना मार्गावरील शहापूर जवळ भीषण अपघात झाला या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने मठतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले.

 

जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या अपघातातील मयत व जखमीचे नावे समजू शकले नाही.

 

या बस मध्ये एकूण २५ प्रवासी होत या एका लहान मुलांचा समावेश होता. अपघात होताच घटना स्थळी मठतांडा येथील नागरिकांनी धाव घेतली जखमींना बसमधून बाहेर काढून अपघाताची पोलीसांना देताच घटना स्थळी गोंदी पोलिस व वाहतूक पोलिसानी धाव घेत जखमींना रूग्णवाहिकाद्वारे अंबड, जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघा तामुळे वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement