Advertisement

अंत्यविधी उरकून येताना काळाचा घाला !

प्रजापत्र | Friday, 19/07/2024
बातमी शेअर करा

 नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता.जुन्नर) शिवारात भीषण अपघात झाला आहे. नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला.यामध्ये तीन जणांचा मृत्यु झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.

 

 

ही घटना दि.१९ शुक्रवार रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली . यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या पाच ते सहा वाहनांना धडक दिली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. अपघातात मृत्यु व जखमींची संख्या वाढू शकते, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement