सातारा - ऐतिहासिक संदर्भ असलेल्या (Satara) सातारा जिल्ह्यातील एका गावाचे नामांतर करण्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. कोरेगाव तालुक्यात असलेल्या रहिमतपूर गावाचे नामांतर करण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर रहिमतपूरचे रघुनाथपूर असे नामांतर केले जाईल, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली.
सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर हे गाव आहे. महसूलमंत्री (Chandrashekhar Bawankule)चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासमोर रहिमतपूर गावाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रघुनाथपूर असे नामांतर केले जाईल, काळजी करू नका, असा शब्द बावनकुळेंनी उपस्थितांना दिला.