Advertisement

औरंगाबाद चे नामकरण करण्याचा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही - नवाब मलिक

प्रजापत्र | Monday, 04/01/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे/केज

मुंबई दि.४ - औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमध्ये दिवसेंदिवस विरोधाभास दिसत आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र काँग्रेसने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यातच राष्ट्रवादी चे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ही आपले मत व्यक्त केले आहे.

        औरंगाबाद शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आले असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं.

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत आम्हाला सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement