Advertisement

दिल्लीच्या दिशेनं मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची कूच

प्रजापत्र | Saturday, 12/12/2020
बातमी शेअर करा

दिल्ली: भारत सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं आंदोलन आणखी आक्रमक होताना दिसतंय. विविध भागातून शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले आहेत.केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी आक्रमक करत, दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करण्यासह सर्व टोलनाके टोल फ्री करण्याची घोषणा केलीय.या सर्व स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना येण्या-जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्ली-हरियाणा आणि दिल्ली-यूपीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही नवे कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

 हेही वाचा 

Advertisement

Advertisement