Advertisement

१३ वर्षीय शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 28/03/2023
बातमी शेअर करा

आष्टी - आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवल्याची घटना सोमवारी (दि.२७ ) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. दिक्षा बाबासाहेब शेलार (वय वर्ष १३) असे मुलीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही आपल्या आजोळी बीडसांगवी येथील ससे वस्तीवर राहत असलेल्या आजोबा व मामाकडे इयत्ता दुसरीत असल्यापासून राहत आहे. आई,वडील ऊसतोडणीला जात असल्याने मामा शिक्षणासाठी सांभाळ करीत होते. सोमवारी घरातील सर्वजण शेतात कामासाठी गेले असताना घरी एकटी असलेल्या दिक्षाने सायंकाळच्या दरम्यान घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी भेट दिली.पंचनामा पोलीस हवालदार विकास राठोड यांनी केला.

Advertisement

Advertisement