Advertisement

शॉटसर्किटमुळे आग लागून तब्बल ५० एकर ऊस जाळून खाक

प्रजापत्र | Friday, 13/11/2020
बातमी शेअर करा

पंढरपूर : पंढरपूर परिसरात शॉटसर्किट मुळे आग लागून सुमारे ५० एकर ऊस जळल्याची घटना घडली आहे. १०ते १२ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरगांव च्या जांभुळकर येथील हि घटना आहे.तोडणी तोंडावर आलेली असतानाच हा ऊस जाळून खाक झाल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. १० महिन्यांचा परिपक्व ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शॉटसर्किट मुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. 

 

Advertisement

Advertisement