Advertisement

अंबाजोगाईच्या अभियंत्याच्या नाशिकच्या धबधब्यात वाहून गेल्याने मृत्यू

प्रजापत्र | Monday, 08/08/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - नाशिक येथील त्र्यंबकेश्वर दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेले अभियंता अविनाश हरिदास गरड (वय ४०, रा. सेलू, ता. अंबाजोगाई) यांचा धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. दरम्यान, अविनाश गरड यांच्यासोबत धबधबा परिसरात अडकलेल्या अन्य २२ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

 

अविनाश गरड हे नोकरी निमित्त नाशिक येथे स्थायिक होते. काल रविवारची सुट्टी असल्याने त्यांच्यासह नाशिकहून २८ जण त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले होते. अशात सांयकाळी पावसाचा जोर वाढला, मुसळधार पावसाने धबधबा ओलांडून गेलेल्यापैकी पाच जण कसे बसे आले. अशात धबधब्यावर पाण्याचा जोर वाढला. त्यामुळे उर्वरित २३ जण पलिकडच्या बाजूला अडकून राहिले होते. पावसाचा आणि पुराचा जोर कमी होईल, या आशेवर वाट पहात बसल्याचा रात्री धीर खचू लागला होता. यावेळी अविनाश गरड हे धबधब्यात पडले आणि पाण्यात वाहून गेले. 

Advertisement

Advertisement