Advertisement

तरूण शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 03/02/2022
बातमी शेअर करा

गेवराई - तालुक्यातील भोजगांव येथील 25 वर्षीय तरूण शेतमजुराने गुरुवार रोजी दुपारी दोन च्या सुमारास शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.या प्रकरणी उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

 

 

    दिपक बाळासाहेब संत वय 25 राहणार भोजगांव असे गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नावं असुन त्याने गुरुवार रोजी दुपारी 2 च्या सुमारास शिवारातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.हा तरूण दुस-यांच्या शेतात शेतमजुरी करण्याचे काम करत होता.याला शेती नव्हती या प्रकरणी पोलिस नवनाथ गोरे,सिद्दीकी यांनी घटनेचा पंचनामा केला असुन.या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Advertisement

Advertisement