परळी-गेल्या काही दिवसांपासून परळी शहरात छोट्या-छोट्या चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. शनिवार (दि.30) रोजी 34 नागरिकांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिलेला आहे. या अर्जात 124 गाढवे चोरीस गेली असल्याचे म्हटले असून शोध घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
परळी शहर पोलिसांत 124 गाढवे चोरीला गेल्याचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अमोल मोरे आणि त्यांच्या सोबतच्या 34 जणांच्या या अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, दि.25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या सुमारास गाढव चोरीस गेली आहेत. मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि नाथ चित्र मंदिर परिसरातून ही चोरी झाल्याचे तक्रारदारांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. उदरनिर्वाहाचे साधन असलेली आमची गाढवे शोधावीत व गुन्हेगारांना शिक्षा करावी अशी विनंती परळी शहर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जातून करण्यात आलेली आहे. चोरीस गेलेल्या 124 गाढवांची बाजारभाव किंमत सरासरी प्रत्येकी 15 सांगण्यात येत असून 18 लक्ष 60 हजारांचे एकूण नुकसान आहे.