Advertisement

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा,” नवनीत राणा यांची मोदी सरकारकडे मागणी

प्रजापत्र | Wednesday, 16/09/2020
बातमी शेअर करा

“करोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. कंगना रणौत आणि शिवसेना वादावर बोलताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, “तिने फक्त आपल्याबद्दल बोलावं, इतरांबद्दल नाही. बॉलिवूडने तिला सर्व काही दिलं असून त्यावर आरोप करु नयेत”.

याआधी नवनीत राणा यांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. “संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी,” असं त्यांनी म्हटलं होतं.

Advertisement

Advertisement