Advertisement

भोजगावावर आस्मानी संकट

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले  
गेवराई-शनिवारी रात्री झालेल्या पावसांत तालुक्यातील नदीला पूर आला असून भोजगाव येथील तरूण रस्त्या ओलाडत असतांना पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह धोंडराईजवळ रविवारी सकाळी आढळून आला. यानंतर पुलाच्या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक भूमिका घेतली. 

 

 

            सुदर्शन संदिपान संत (वय-३७ रा.भोजगाव) असे त्या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी एका मुलीने आत्महत्या केली होती. तिचे मृतदेह घेऊन जात असतांना पुल तुटल्यामुळे बैलगाडी देखील पाण्यात फसली म्हणुन नातेवाईक यांच्यावर प्रेत खांद्यावर नेण्याची नामुष्की आली होती.या प्रकरणी जबाबदार कोण ? याठिकाणी सत्तेचं राजकारण करणा-या एकही पुढारी यांनी याठिकाणी भेट दिली नाही.पर्यायी रस्ता अथवा पुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.महिनाभरात भोजगावमधील हि तिसरी घटना आहे.आणखी किती बळी गेल्यावर भोजगांवाचा पुल होणार असा प्रश्न येथील ग्रामस्त यांच्या वतीने विचारण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement