Advertisement

मांजरा ओव्हरफ्लो

प्रजापत्र | Wednesday, 22/09/2021
बातमी शेअर करा

केज दि.22 – बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी (दि. २१) दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे आज बुधवारी (दि. २२) सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

 


               

  मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून १.२७ प्रतीसे.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सरू करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी पहाटेपर्यन्त धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला. त्यामुळे सकाळी ६ धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला.

Advertisement

Advertisement