Advertisement

केवळ सात वर्षाच्या मुलीने वाचवले पित्याचे प्राण

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

कराड दि.७-  संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन दुचाकी नदीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी कराड तालुक्यातील आंबवडे कोळे येथे घडली. वांग नदीवर  असणाऱ्या फरशी पुलावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱे संरक्षक कठडा नसल्याने दुचाकी पुलावरून डोहात पडुन चौघे पाण्यात बुडाले. मात्र दुचाकीवरील पोहता येत असलेल्या सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचवले परंतु पाण्यात पडलेल्या दुचाकीवरील आजी नातवाचा बुडून मृत्यू झाला.

            मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे चौघे एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. सदरील घटनेची कराड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

                       कराड तालुक्यातील येरवळे येथील एकाच कुटुंबातील चौघेजण शरद यादव (आई) मालन यादव समवेत दोन मुले तनुजा अणि पियुष दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन ते घरी परतत होते. परतताना पुलावरून दुचाकी त्यांची दुचाकी घसरली. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बांधकाम सुरु असून खडी व वाळू त्याठिकाणी पसरली आहे. त्यामुळे फसगतीने चौघेही दुचाकीसह साधारण 20 फुट खोल नदीच्या डोहात पडले अणि बुडाले. तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणुन पाण्याबाहेर काढले, काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. बाहेर काढत असताना तो पर्यंत काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडले.

                      दरम्यान आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तनुजाने केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. केवळ सात वर्षाच्या जिगरबाज मुलीने जिवाची पर्वा न करता पोहण्याचा कलेचा पुरेपूर वापर करत तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णत: यश आले नाही. आजी अणि भावाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

Advertisement

Advertisement