Advertisement

अखेर संजय राठोड यांनी मौन सोडले

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२३ - पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचं बंजारा समाजाला आणि आम्हाला दु:ख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. तिच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण केले जातेय.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या प्रकरणावरुन गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदनामी करु नका, असं आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.

         तसेच मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा नेता आहे. माझ्या राजकीय जीवनाला उद्धवस्त करण्यासाठीचं षडयंत्र गेले. या कुठल्याच गोष्टीत तथ्य नाही. सर्वांना विनंती की माझी, कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी करु नका. माझी पत्नी आहे, आई वडील आहे, मुलं बाळं आहेत, त्यांना सावरत होतो. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार असून चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा असे ते म्हणाले.

     दरम्यान सोशल मीडियावर फोटो आपण सर्वजण पाहता.परंतु अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली 30वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये  उभं करु नका, असं संजय राठोड म्हणाले. मी विश्वासाने सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. अरुण राठोडवर बोलण्यास मात्र संजय राठोड यांनी नकार दिला.

Advertisement

Advertisement