Advertisement

शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 30/06/2025
बातमी शेअर करा

नागपूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी नागपुरातील थांबलेल्या दोन वारकऱ्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मधुकर तुकारामजी शेंडे (५६, राजाबक्षा, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (२२) असे मृतक वारकऱ्यांची नावे आहेत. दोघेही निस्सिम विठ्ठलभक्त होते. शेंडे हे नेहमीप्रमाणे यंदादेखील उत्साहाने वारीत सहभागी झाले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता. 

          बरड जवळील टोलनाका येथे मुक्कामसाठी टेंट उभारताना तुषार यांने लोखंडी रॉडला हात लावल्यानंतर त्यांना शॉक बसला. तुषार रॉडला चिटकल्याने त्यांना बाजूला काढण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव हेही तुषार यांना चिटकले. तेव्हा दोघांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी जवळच्या काही वारकऱ्यांनी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला कॉल केला. दोघांनाही उपचारासाठी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.

Advertisement

Advertisement