Advertisement

कोरोनामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ बदल

प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार असून करोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. करोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असं असतानाच आज सकाळी अर्थ मंत्रालयामधून संसदेसाठी निघाण्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. अर्थमंत्र्याच्या घोषणेमुळे करोनामुळे यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं.

सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी करोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे अशी माहिती दिली. या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल असंही सांगण्यात आलं आहे.

Advertisement

Advertisement