अमरावती: माजी आ.तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका बसला आहे. त्यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षदासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय दिला असून न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका बच्चू कडू यांच्यावरठेवण्यात आला आहे.
या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू माध्यमांना बोलताना म्हणले,हा आंदोलनाचा परिणाम आहे. मला आता या निर्णयाची माहिती मिळाली. तिथे जो जेटी आहे, तो एका मंत्र्याला नातेवाईक आहे. त्याने हे कारनामे केले आहेत. माझ्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.आम्हाला आता आंदोलनाचे परिणाम भोगावे लागणार आहेत. यासंदर्भात आम्ही यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली असून त्यात आम्ही सविवस्तर भूमिका मांडू, अशी माहितीही त्यांनी दिली.