Advertisement

ग्रामपंचायत निवडणुकीत जयदत्त क्षीरसागरांचे जोरदार कमबॅक

प्रजापत्र | Monday, 18/01/2021
बातमी शेअर करा

बीड-विधानसभा निवडणुकीत पुतण्या आ.संदीप क्षीरसागरांकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधत बीड मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीवर भगवा फडकवला आहे.पोखरी- मैंदा, जिरेवाडी, वासनवाडी, कर्झणी, गुंदा,कोळवाडी, मौज, मौजवाडी ग्रामपंचायत जयदत्त क्षीरसागरांच्या ताब्यात आल्या असून आ.संदीप क्षीरसागर यांनी बहिरवाडी, मोची पिंपळगावमध्ये सत्ता काबीज केली.गेवराई तालुक्यातील आनंदवाडीमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केले. तसेच शिरुरकासारमधील येवलवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. रायमोहा,तिप्पटवाडी,वंजारवाडी हटकरवाडी, टाकळवाडी, भानकवाडी ग्रामपंचायतवर जयदत्त क्षीरसागरांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.दरम्यान जयदत्त क्षीरसागरांचे बीड मतदारसंघात जोरदार कमबॅक झाले असल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट होत आहे.

Advertisement

Advertisement