Advertisement

पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा

गेवराई-तुरीचे खळं शेतात चालू असताना विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (दि.९) घडली. 
          दादासाहेब सतीश भोसले (वय-२२) असे त्या तरुणाचे नाव असून उमापुर जवळील मारुतीची वाडी शिवारातील विहिरीवर ते पाणी आणण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले.यावेळी त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला.दरम्यान नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.चकलांबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मिकता मृत्युची नोंद करण्यात आली. 

 

Advertisement

Advertisement