गेवराई : तालुक्यातील सावळेश्वर , राक्षसभूवन , तसेच गंगावाडी या परिसरातून तहसिलदार रजेवर गेल्यापासुन अनाधिकृत वाळू उपसा होत आहे यांच्या अनेक तक्रारी झाल्या परंतू महसुल व पोलीस यांच्या नाकारतेपणामुळे एका शेतक-यांचा बळी गेला असल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली आहे .
हेही वाचा
रुस्तूम मते वय ६० वर्ष राहणार गंगावाडी असे या मयत शेतकरी यांचे नाव असुन आज सकाळी आपल्या शेतात जात असतांना त्याला रस्त्यातच एका वाळूच्या हायवाने चिरडले आहे एक नसुन दोन हायवा या व्यक्तीच्या अंगावरून गेल्याने संपुर्ण प्रेताचे तूकडे झाले आहेत गांवकरी आक्रमक झाले असुन त्यांनी राक्षसभूवन रस्त्यावर ठिय्या मांडला आहे जो पर्यंत जिल्हाधीकारी येत नाहीत तोपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे .
बातमी शेअर करा