Advertisement

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सचिन वाझेंना क्राइम ब्रँचमधून हलवले

प्रजापत्र | Wednesday, 10/03/2021
बातमी शेअर करा

मुंबईः मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. सचिन वाझेंवर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. तसंच, सचिन वाझेंना अटक करण्याची मागणीही होत होती. या सगळ्या प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीनंदेखील सचिन वाझे यांच्यांवर आरोप केले होते. त्यानंतर विरोधक या प्रकरणावरुन आक्रमक झाले होते. या प्रकरणी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत निवेदन दिलं आहे. यात गुन्हे शाखेत API या पदावर कार्यरत असलेले सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, या प्रकरणाचा निप्षक्षपणे चौकशी होणार आहे. या प्रकरणात कोणीही दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे यांच्या बदलीचे निवेदन सादर करताना सभागृहात एकच गदारोळ माजला होता. विधानपरिषदेते विरोधी पक्ष नेते यांनी सचिन वाझे यांच्या बदलीपेक्षा त्यांचं निलंबन करा, या मागणीवर ठाम होते. सचिन वाझे यांना अटक व्हावी अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. हीच मागणी उचलून धरत आज प्रवीण दरेकर यांनीही विधानपरिषदेत वझेंना अटक करा किंवा त्यांचे निलंबन करा, ही मागणी केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल सचिन वाझे यांच्याविरुद्ध अनेक पुरावे असुनही त्यांना अटक हा होत नाही, वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, इतके गंभीर आरोप असताना वाझेंना पदावर ठेवणे योग्य नाही. ते पुरावे नष्ट करु शकतात, अशी शंकाही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली होती. तेव्हापासून वाझे यांच्या निलंबनाची मागणी जोर धरु लागली होती.
 

Advertisement

Advertisement