Advertisement

विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी

प्रजापत्र | Sunday, 29/09/2024
बातमी शेअर करा

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अशातच पक्ष आपापल्या परिण सर्व प्रयत्न करत आहेत, सभा बैठका, पक्षांतर, जागावाटप या घडामोडींना वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडीने देखील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील तिन पक्ष एकत्रित लढत आहेत. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी या तीन पक्षांकडून या नेत्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत या कमिटीत असतील. हे तिन्ही नेते कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतील. येत्या दहा दिवसात त्यांचा अहवाल ही समिती देणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरच्या आत पार पडतील, अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

 

 

शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. या कमिटीमध्ये जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे. जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो उमेदवार इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही. तर गावातील सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement