Advertisement

औरंगाबाद चे नाव बदलण्याचा अजेंडा काँग्रेसला मान्य नाही - बाळासाहेब थोरात

प्रजापत्र | Thursday, 31/12/2020
बातमी शेअर करा

बीड दि.३१ - औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. यासंदर्भात आजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली.बाळासाहेब थोरात यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं म्हटलं जातं आहे.

           “औरंगाबादचं नाव बदलण्याचा अजेंडा काँग्रेसला मान्य नाही. महाविकास आघाडी सरकारची स्थापना विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे. यामध्ये हा अजेंडा नाही. त्यामुळे आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करतोय.” तसेच “नाव बदलण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. नाव बदल करून काही होऊ शकत नाही. विकास कसा करता येईल हे महत्त्वाचं आहे. शिवाय असा प्रस्ताव शिवसेना आणणार नसल्याची मला खात्री आहे असेही ते म्हणाले.

 हेही वाचा 

Advertisement

Advertisement