Advertisement

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा

प्रजापत्र | Tuesday, 29/11/2022
बातमी शेअर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

 

 

फडणवीसांचे टविट काय?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत आमच्याकडे 11 लाख 80 हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 

Advertisement

Advertisement