Advertisement

विष पाजून विवाहितेला मारल्याचा नातेवाईकांचा आरोप

प्रजापत्र | Friday, 25/06/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले

गेवराई-शहरातील सिद्धिविनायक भागातील एका विवाहित महिलेला विष पाजून ठार मारल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला असून गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी ठिय्या मांडला आहे. रात्री 10.30 वाजता गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह ठाण्यात आणल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

     कांचन (उर्फ कविता) राठोड  (वय-२६ रा. सिद्धीविनायक नगर)असे मृत विवाहितेचे नाव आहे.2017 साली कांचनचा विशाल राठोडसोबत विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून कांचन आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये घरगुती कारणातून वाद सुरु होते.या वादातुनच 10 जून रोजी तिला तिचा नवरा विशाल, त्याचे वडील, आई आणि भावाने मिळून बळजबरीने विष पाजले. यावेळी अत्यवस्थ अवस्थेत कांचनाला गेवराई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने नंतर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

दरम्यान याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात मयाताच्या नातेवाईकांनी मृतदेह आणत आक्रमक पवित्रा घेत खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. सध्या गेवराई पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

नवरा फरार
घटनेनंतर विशाल राठोड हा फरार झाला असल्याची माहिती असून गेवराई पोलीस याप्रकरणात गुन्हा दाखल करत आहेत. यानंतर याप्रकारणाचा तपास सुरु होईल.

Advertisement

Advertisement