Advertisement

२१० रुग्ण कोरोनामुक्त तर ३९ जणांनी गमाविले प्राण

प्रजापत्र | Monday, 14/06/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी कोरोनाबळींचा वाढता आकडा जिल्हावासीयांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. आरोग्य विभागाच्या अहवालातून २४ तासात १० रुग्णांनी प्राण गमावले असून जुन्या २९ जणांच्या मृत्युची नोंद सोमवारी करण्यात आल्याने बळींचा आकडा ३९ च्या घरात गेला.

 

    सोमवारी २२१७ अहवालात १५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २०६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.सायंकाळी आरोग्य विभागाच्या अहवालात १० कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून जुन्या २९ जणांच्या मृत्युची देखील नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्याचा डेथ रेट २.६२ टक्के असून कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९५.६३ टक्के आहे.आतापर्यंत ८५ हजार ५८७ जणांनी कोरोनावर मात केली असून २३४६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

Advertisement

Advertisement