Advertisement

लग्नासाठी आलेल्या दोन शाळकरी विद्यार्थांचा पैठण उजव्या कालव्यात बुडून मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 18/03/2021
बातमी शेअर करा

गेवराई- तालूक्यातील गुळज भगवान नगर येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेले दोन शाळकरी विद्यार्थी आज दि१७ मार्च बुधवार रोजी दुपारी 3वा सुमारास भगवा नगर येथुन जवळच असलेले पैठण उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेले वाहत्या पाण्यात बुडाल्याची  घटना घडली आसुन शेरव अरबाज वय १३ वर्ष रा पैठण शेख नाशिर १२वर्ष रा रामपुरी हे दोघे जण बुडाले असुन सदर घटना घडल्यापासुन नातेवाईक त्यांचा शोध घेत आसुन रात्री उशीरा शेख अरबाजचा मृतदेह सापडला आहे .

सदर घटना घडल्यापासुन नातेवाईक व बीड येथील शोध पथकास पाचारण करून त्यांची टिम व उमापुर पोलीसात माहिती देण्यात आली असता त्यांनी सुद्धा घटनेच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली व शोध कार्य चालु आसुन रात्री १० वा तळणेवाडी येथील सीआरचार वरील गेट वर येऊन नातेवाईक शेरवनाशेर याचा शोध घेण्यासाठी येऊन थाबले आसुन आजुनपर्यंत तरी शोध लागला नसुन शोध कार्य चालू आहे.

Advertisement

Advertisement