Advertisement

दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

प्रजापत्र | Saturday, 16/03/2024
बातमी शेअर करा

माजलगाव- तालुक्यातील पात्रुड येथे एका शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर लऊळ येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले. या दोन्ही घटना शुक्रवारी रात्री घडल्या आहेत. दरम्यान पोलिसात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक माहिती अशी कि, पात्रुड येथील शेतकरी सत्यभान भगवान शितकर (वय-29) या तरुण शेतकर्‍याने शेतीतील नापिकीला कंटाळून शुक्रवारी (दि.१५)  विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर लऊळ येतील शेतकरी बाळू अंकुश आवटे (वय-25) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील आत्महत्तेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
 

Advertisement

Advertisement