Advertisement

अखेर ठरलं या तारखेपासून सुरु होणार ५ ते ८ वी शाळा

प्रजापत्र | Friday, 15/01/2021
बातमी शेअर करा

बीड-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यांपासून ५ ते ८ वी शाळा बंद होत्या.मात्र आता २७ जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१५) शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २७ जानेवारीपासून शाळा सुरू होतील अशी माहिती दिली आहे.विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement