Advertisement

  दहीफळ खून प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रजापत्र | Friday, 12/06/2026
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.१२(प्रतिनिधी):तालुक्यातील पहाडी दहीफळ येथे झालेल्या युवकाच्या खून प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्नाखोटा (ता. वडवणी, जि. बीड) येथील आदित्य शरद धनवे (वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शरद आश्रुबा धनवे (वय ४२) यांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी आबासाहेब शेषेराव मस्के, कमलाकर शाहू मस्के, रंजित शेषेराव मस्के (रा. पहाडी दहीफळ) व पोपट दादाराव डोंगरे (रा. सोन्नाखोटा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना गुरुवार (दि.११) जून रोजी सायंकाळी पहाडी दहीफळ येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीतील आरोपांनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्याने मृत्यु झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३७/२०२६ दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सहायक निरीक्षक राजेंद्र घुगे हे करत आहेत. या खुन प्रकरणातील चार हि आरोपी फरार असून विशेष पोलीस पथक नेमून त्यांचा शोध सुरू असल्याचे एपीआय श्री.घुगे या़नी सांगितले.

Advertisement

Advertisement