Advertisement

 रेल्वेरूळ ओलांडताना इंजिनच्या धडकते वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 10/01/2024
बातमी शेअर करा

कडा- सध्या रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याने मालाची वाहतूक करण्यासाठी इंजिन धावत असते. या इंजिनच्या धडकेत एका ७२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. लाभा दिंगाबर गवळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

 

 

आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील गवळीवस्तीवरील रहिवासी लाभा दिंगाबर गवळी हे घरापासून जवळच असलेल्या शेतात कामानिमित्त गेले होते. सकाळी  साडेअकरा वाजेच्या दरम्यान ते परत असताना रेल्वेरूळ ओलंडत होते. याच वेळी नगरवरून साहित्य घेऊन येणाऱ्या इंजिनची त्यांना धडक बसली. यात गवळी यांचा जागीच मृत्यू झाला. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना केला.

Advertisement

Advertisement