Advertisement

पाळी घालताना विजेचा शॉक बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 01/07/2023
बातमी शेअर करा

आष्टी - महाराष्ट्रभर आज कृषी दिन साजरा होत असतानाच आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गुंडवाडी येथे आपल्या शेतात पोलच्या ताणाला 
करंट उतरला असल्याने शेतात पाळी घालत असताना औत ताणाला गुंतलेल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. बबन जयवंत जाधव वय ३८ असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

 

सध्या पेरणीपूर्वीची शेतात मशागत सुरू आहे. त्यात पावसाने धडी मारली असून आपल्या घराशेजारील शेतात पेरणीच्या अगोदरची औताने मशागत करत असलेले शेतकरी बबन जयवंत जाधव यांचा शेतात असलेल्या पोलच्या ताण दिलेल्या तारेला औत गुंतलेल्याने त्यात करंट उतरून दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. ही घटना कृषी दिनी शनिवार (दि.१) जुलै रोजी सकाळी घडली आहे. यामुळे बीडसंगवी गुंडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात  वडील,आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

Advertisement

Advertisement