Advertisement

विवाहीतेची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 01/08/2022
बातमी शेअर करा

गेवराई - विवाहीतेने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली. सदर प्रकार आत्महत्येचा नसुन सासरच्या लोकांनी तिची हत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सासु सासऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी नातेवाईकांनी गेवराई- शेवगांव रस्त्यावरील उमापुर फाट्यावर तासभर ठिय्या मांडला होता.

गेवराई तालुक्यातील नरसिंह तांडा येथे काल अंजली सुनिल राठोड या विवाहीतेने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र नातेवाईकांनी दुपारी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. तिचा सासरकडून सतत छळ केला जात होता. घटनेनंतर मुलीची सासु, सासरे आणि भाया फरार झाले असुन त्यांनीच आपल्या मुलीला जिवे मारल्याचा आरोप करत मयत विवाहीतेच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेता गेवराई-शेवगांव रस्त्यावर तासभर ठिय्या मांडला. अखेर डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्या मध्वस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी सपोनि. भास्कर नवले, डिगांबर पवार, अमोल येळे, गाडे तळ ठोकुन होते. दरम्यान या प्रकरणातील मयत महिलेचा पती सुनिल राठोड यानेही काल विष घेतले होते अशी माहिती समोर आली आहे.

Advertisement

Advertisement